Type Here to Get Search Results !

मुंबई खुली झाली, पुणे का नाही?; अमृता फडणवीसांचा सवाल

पुणे: करोना संसर्गात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच, महापालिकांना आपापल्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेनं शहरातील बहुतांशी निर्बंध उठवले आहेत. पुण्याच्या बाबतीत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. () वाचा: अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात एका हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पुण्यातील करोना निर्बंधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'पुण्यात करोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही,' असं आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं. 'मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. करोनाचे रुग्ण आता कमी झालेत. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. निर्बंधांमुळं कमी वेळेत जास्त गर्दी होते आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. वेळा वाढविल्यास गर्दी विभागली जाईल. छोट्या व्यावसायिकांचाही सरकारनं विचार करावा. एवढे दिवस त्यांचा रोजगार गेला आहे. त्यामुळं आता पुणेकरांनीच दबाब आणण्यासाठी धरणं आंदोलन केलं पाहिजे,' असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. अमृता फडणवीसांच्या टीकेचा रोख जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे. वाचा: पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, अजित पवार हे पालकमंत्री या नात्यानं दर शुक्रवारी करोना स्थितीचा आढावा घेत असतात. त्यानंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. पुणे शहरात सध्या करोनाचा संसर्ग घटल्याचं चित्र आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील एका गावात झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xpBaxj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.