Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळाचे नाव बदललेय का?; अदानी समूहाने दिले 'हे' स्पष्टीकरण

मुंबई: शिवसैनिकांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार राडा केला. विमानतळावर लावण्यात आलेल्या या नामफलकांची शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेच्या या आंदोलनाने खळबळ उडाली असतानाच नामफलकाबाबत महत्त्वाचे आणि तातडीचे स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आले आहे. ( ) वाचा: शिवसेनेच्या आंदोलनानंतर कंपनीच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करत कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. ', ' या नावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे कंपनीकडून नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी अदानी एअरपोर्ट हा फलक लावण्यामागचे कारणही कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचा: अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) विमानतळाचा ताबा मिळाल्यानंतर पूर्वीच्या कंपनीच्या जागी आपलं ब्रँडिंग करत आहे. केवळ जीव्हीकेच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावात वा टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांचे निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सर्वकाही करण्यात आलेलं आहे. अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड कंपनी विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन यापुढेही करत राहील, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: विमानतळावर नेमकं काय घडलं? मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अलीकडेच जीव्हीके कडून अदानी समूहाकडे आला. त्यानंतर विमानतळावर अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावण्यात आले आहेत. या नामफलकांना शिवसैनिकांनी आज लक्ष्य केले. शिवसैनिकांनी शिवरायांचा जयघोष करत अदानींच्या नामफलकांची तोडफोड केली. शिवाजी महाराजांचे नाव हटवून अदानी समूह आपले नाव एअरपोर्टला देणार असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील संघर्ष टाळण्यासाठी अदानी समूहाने तातडीने स्पष्टीकरण दिले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3flQqVR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.