Type Here to Get Search Results !

खेलरत्न: 'हा निर्णय मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्यासाठी नव्हे तर...'

मुंबई: पुरस्कारातून यांचे नाव वगळल्याने त्यांची महती कमी झालेली नसून, मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघडी पडली, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी केली आहे. ( ) वाचा: पुरस्काराला यांचे नाव देण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारकडे नवनिर्मितीच्या दृष्टीची वाणवा असून, त्यांची कार्यक्षमता केवळ कुत्सित राजकारण करण्याइतपत मर्यादित आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या काळातील योजना असो वा पुरस्कार; राजकीय हेतुने त्यांचे नामकरण करण्याचा एकमेव उद्योग मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी एखादा भरीव उपक्रम सुरू करणे मोदी सरकारला सहज शक्य होते. परंतु, त्याऐवजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या पुरस्काराचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्याचा उदात्त हेतु नसून, राजीव गांधी यांचे नाव हटवण्याचा छुपा अजेंडा आहे. वाचा: 'राजीव गांधी हे युवकांचे नेते होते. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या स्पर्धेतून त्यांचे क्रीडा प्रेम व व्यवस्थापन कौशल्य दिसून आले होते. याच स्पर्धेच्या निमित्ताने भारतात रंगीत टीव्हीचे युग सुरू झाले होते. खेळावर प्रेम करणारे तरुण नेते म्हणून खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव संयुक्तिकच होते. मात्र मोदी सरकारने गांधी-नेहरू घराण्याच्या द्वेषातून हे नामकरण केले असून, त्यांचा हा द्वेष निंदनीय आहे', असे चव्हाण म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vmbbdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.