Type Here to Get Search Results !

सांगली महापालिकेच्या दारात उभे ठाकले चार घोडे!; 'हे' आहे कारण

सांगली: वर्षभरापूर्वीच शहरात शंभर कोटी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते पावसाने वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे महापालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. महापालिकेकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काढला. ( ) वाचा: गेल्या महिनाभरात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगलीतील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी मोठे खड्डे असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. पुराचे पाणी ओसरताच महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती सुरू करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याचेही काम सुरू केलेले नाही. यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचा: वर्षभरापूर्वीच शंभर कोटी रुपये खर्च करून शहरात रस्ते बांधण्यात आले. त्यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी शहरातील रस्त्यांचे कौतुक करीत ते दीर्घकाळ टिकतील असे जाहीर केले होते. अतिवृष्टीत रस्ते वाहून गेल्याने रस्त्यांच्या दर्जाची पोलखोल झाल्याचा आरोप दलित महासंघाने केला आहे. महासंघाचे पदाधिकारी यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी ते चार घोडे घेऊन महापालिकेच्या दारात पोहचले. खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना वाहनांच्या ऐवजी घोड्यांचा वापर करावा लागेल, यामुळे घोड्यासह मोर्चा काढल्याचे त्यांनी सांगितले. तातडीने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jynpaN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.