Type Here to Get Search Results !

'MPSC बाबत सरकार गंभीर नाही', देवेंद्र फडणवीस यांची गंभीर टीका

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. याच मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बाबत गंभीर नाही अशी टीका अधिवेशनावेळी केली आहे. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकारला याबद्दल गांभीर्य नाही. स्वप्निलने जे टोकाचं पाऊल उचललं त्यावर तातडीने विचार व्हायला हवा. अशा घटना होईपर्यंत सरकार आणि आयोग काय करतं असाही थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाहीतर विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे असं म्हणत एमपीएससी मुद्द्यांवर भाजपकडून स्थगन प्रस्थाव करण्यात आला आहे. अधिवेशनात फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच नाहीतर सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील स्वप्निलच्या आत्महत्या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे. कालपासून १०० विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले. ४३० एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थी नैराश्येत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्याची गरज आहे. स्वप्निलच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावलं आहे. त्यामुळे स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत जाहीर करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांची मोठी घोषणा स्वप्निल लोणकरची आत्महत्या ही घटना वेदनादायी आहे. विरोधकांनी यावर अधिवेशनात मागणी केल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे एमपीएसीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hfVyvW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.