Type Here to Get Search Results !

employment: गेल्या सहा महिन्यांत किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या?; नवाब मलिक म्हणतात...

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना रोजगारासंबंधी दिलासा देणारे वृत्त आहे. , आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात गेल्याच महिन्यात तब्बल १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. ही माहिती कौशल्य विकासमंत्री यांनी दिली. (last month 15 thousand 336 unemployed people have been provided in the state says minister ) राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम वेबपोर्टलद्वारे, तसेच ऑनलाईन रोजगार मेळावे भरवले जातात. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालण्याचे काम करण्यात येत असते. असे प्रयत्न करत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अशा प्रयत्नांद्वारे गेल्या वर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे या वर्षात म्हणजेच जानेवारी ते जूनअखेर ७८ हजार ३९१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे मलिक यांनी माहिती देताना सांगितले. क्लिक करा आणि वाचा- राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://ift.tt/3hxs0Ib हे वेबपोर्टल सुरु केले असून, या पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव अशा प्रकारची महत्वाची माहिती नोंद करत असतात. या पोर्टवर कंपन्यांना त्यांना हवे असलेले उमेदवार उफलब्ध होत असतात. महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९० हजार २६० सार्वजनिक आणि खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे, अशी माहितीही मलिक यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- मलिक यांनी नोंदणीबाबत माहिती देताना सांगितले की, मागच्या महिन्यात विभागाकडे ३३ हजार ३२९ उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार १०९, नाशिक विभागात ६ हजार ५९४, पुणे विभागात ९ हजार ६०४, औरंगाबाद विभागात ५ हजार १४१, अमरावती विभागात १ हजार २९४ तर नागपूर विभागात १ हजार ५८७ इतक्या बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी केलेली आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच मागील महिन्यात (जून २०२१) कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे एकूण १५ हजार ३३६ उमेदवारांना नोकऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. यात मुंबई विभागात सर्वाधिक, म्हणजेच ६ हजार ३३० उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या. तसेच, नाशिक विभागात ३ हजार १११, पुणे विभागात ४ हजार ७८, औरंगाबाद विभागात १ हजार ६५२, अमरावती विभागात ७९ तर नागपूर विभागात ८६ इतक्या बेरोजगार उमेदवारांना नोकऱ्या प्राप्त झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yCmBrh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.