Type Here to Get Search Results !

आता पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

म .टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः सारथी वगळता इतर कोणत्याच मराठा समाजाच्या () मागण्याबाबत सरकार पातळीवर हालचाली होताना दिसत नाहीत, त्यामुळे दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मूक आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती () यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिला. 'सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी २१ दिवसांची मुदत मागितली होती. तरीही आम्ही एक महिन्याची मुदत देत आंदोलन स्थगित केले. ही मुदत आता संपत आली आहे. पण एवढ्या दिवसात सारथी वगळता इतर कोणत्याच मागण्या बाबत पूर्तता होताना दिसत नाही. मागण्या मान्य झाल्या. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्यामुळे आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे,' असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. वाचाः 'एक महिन्याची मुदत दिली होती. आणखी पंधरा दिवस वाट पाहू. पण त्यापेक्षा अधिक वाट पाहणार नाही. आमच्यापुढे मूक आंदोलनाचा पर्याय खुला आहे. त्यासाठी रस्त्यावरच उतरण्याची गरज नाही. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता समाज बोलणार नाही. लोकप्रतिनिधींनी बोलायचे आहे,' असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. वाचाः 'मी शांत आहे. सारखं तलवार काढून उपयोग नाही. कधी आक्रमक व्हायचे हे मला चांगले माहीत आहे. म्हणून दिलेल्या मुदतीत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास आक्रमक व्हावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान १४ जुलै रोजी सारथी बाबत महत्वाची बैठक सरकारने बोलवले,' असल्याची माहिती त्यांनी दिली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e2cYKt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.