: जिल्ह्यात ट्रक पलटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार हा अपघात झाला. अपघातात ट्रक चालक नवनात शेंडे (३८) जागीच ठार झाले. जखमींमध्ये अनिल बावणे (५०), मोरेश्वर कावळे (४५), प्रकाश मंदाडे (४५) यांचा समावेश असून हे सर्व व मृतक ट्रक चालक चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सिमडा येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यातील दक्षिण भागातील एटापल्ली तालुका मुख्यालयातून धानाचा भुसा घेऊन हा ट्रक (एमएच ३१, सीबी ६६८१) निघाला होता. मात्र एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटला. अपघाताची माहिती मिळताच आलापल्ली येथील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख प्रफुल्ल येरणे यांनी स्वतःची चारचाकी गाडी घेऊन लगेच घटनास्थळ गाठले व जखमींना तात्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख व आलापल्ली येथील टायगर गृपचे आदर्श केसलवार, अशोक मद्देर्लावार, मल्लेश आलाम, हसन खान व अहेरी येथील सुरेंद्र अलोने, शैलेश पटवर्धन, बिरजू गेडाम यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन जखमींना मदत केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kfDXpK