Type Here to Get Search Results !

शिवसेनेत काय चाललंय?; मंत्री गुलाबराव पाटलांवर आमदाराचा गंभीर आरोप

जळगाव: ' जिल्ह्यात शिवसेनेत मागील २५ वर्षांपासून निष्ठेने काम करीत आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील मला स्थानिक पातळीवरील निर्णयांच्या बाबतीत विश्वासात घेतले जात नाही. पालकमंत्री यांच्याकडून नियोजन समितीमधून निधी देताना देखील माझ्याबद्दल दुजाभाव केला गेला' असा थेट आरोप येथील आमदार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. आपण पक्ष सोडून जावे यासाठी पक्षातून काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. चिमणराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच आता चव्हाट्यावर आली आहे. ( ) वाचा: जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने खासदार संजय राऊत यांनी दौरा केला. त्यांचा दौरा झाल्यानंतरही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी थांबलेली नाही. पारोळा येथील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आज जाहीरपणे शिवसेनेचे उपनेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, पक्षात मला विनाकारण स्थानिक नेते त्रास देत आहेत. मी पक्षातून बाहेर जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे. पक्षात अलीकडेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख दिला आहे. माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत आपणास साधी माहिती देखील देण्यात आली नाही, अशी खंत चिमणराव यांनी व्यक्त केली. वाचा: 'माझे वर्चस्व खुपत असल्याने २०१४ च्या निवडणुकीत माझा पराभव घडून आणण्यात आला होता. आपला वरिष्ठ नेत्यांवर राग नाही. परंतु, स्थानिक पातळीवर नेते त्रास देत आहेत. याची माहिती आता मी वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. मी कट्टर शिवसैनिक असल्याने कुणी कितीही त्रास दिला तरी सोडणार नाहीट, असेही आमदार चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xdGiFB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.