Type Here to Get Search Results !

राज्यकर्तेच खंडणीखोर असतील तर...; सांगलीच्या त्या घटनेवरुन भाजप नेत्याचा संताप

मुंबईः मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार सांगलीतील इस्लामपुरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळं संताप व्यक्त होत असताना भाजपनं या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन भाजपचे नेते यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाचाः 'पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे. राज्यकर्तेच खंडणीखोर असले तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मुळापासून मिटवता येईल एव्हढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत,' अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. वाचाः नेमकं काय घडलं? सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअरमध्ये उपचारादरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू ८ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, डॉक्टरांनी मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय घडले, ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टरविरोधात तक्रार केली. तसंच या प्रकरणी पाठपुरावा केला. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले आणि डॉ. वाठारकर अलगद फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AABrjT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.