Type Here to Get Search Results !

Violation of corona rules: धक्कादायक! ओमिक्रॉनचा रुग्ण असलेल्या डोंबिवलीत राष्ट्रवादीचा निष्काळजीपणा; कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन

कल्याण: कल्याण- डोंबिवलीत () काल राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा (Omicron) रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ उडाली. मात्र, असं असतानाही राजकीय पक्षांना त्यांची काही काळजी नसल्याचं स्पष्ट होत आहे. राज्य सरकार आणि महापालिकेडून करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले जात असतानाही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्याच कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसून आले. कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर () आल्या होत्या. या कार्यक्रमात करोना नियमांचा पुरता फज्जा उडालेला दिसला. (a large crowd at the program in kalyan dombivali, where patient found no social distancing and no mask used) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयास भेट दिली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. रुपाली चाकणकर यांनी महिला कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमादरम्यान बहुतांश महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता. तसेच या कार्यक्रमात सोशल डिस्टसींगचाही फज्जा उडाला होता. क्लिक करा आणि वाचा- याविषयी चाकणकर यांना विचारणा केली असता त्यांनी सगळ्यांनी मास्क वापरावे असं आवाहन आवाहन आम्ही केलं आणि सतत करत आहोत असं सांगितलं. आज काहींनी मास्क वापरलं नव्हतं. याबाबत त्यांना आज कडक सूचना देण्यात येतील असंही त्या म्हणाल्या. 'त्या'साठी सरपंचाला धरणार जबाबदार यावेळी चाकणकर यांनी बालविवाहाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ज्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत बालविवाह होईल त्या गावच्या सरपंचावर, तसेच त्या लग्नाची खोटी नोंद करणारे अधिकारी यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ कारवाई करून त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस महिला आयोगाने राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- बालविवाह रोखण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडून कठोर पावले उचलली जात असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली .यावेळी बोलताना चाकणकर यांनी एकट्या सोलापूर मध्ये गेल्या वर्षभरात १०५ बालविवाह रोखण्यात आलेत असे सांगितले. नोंद नसलेले, माहीत नसलेले जवळपास ४५० ते ५०० बालविवाह एका जिल्ह्याच्या ठिकाणी होतात हे दुर्दैवी आहे.यामध्ये मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण देखील मोठं असल्याचं त्यांनी सांगितलं . क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IwQCyu

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.