औरंगाबादः महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानं केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून कोयत्याने वार करत बहिणीची मुंडक छाटून हत्या केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेमुळं पसिरात हळहळ व्यक्त होत असून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची चर्चा आहे. वाचाः बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून आले होते. बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपीनं मनात ठेवला होता. त्याच रागाच्या भरातून भावाने बहिणीची हत्या केली. धारदार कोयत्याने मुंडक धडावेगळ करत तरुणीची हत्या केली आहे. या तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. वाचाः दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या भाऊ अल्पवयीन असल्याचे कळतंय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IkqJBK