नाशिकः ज्येष्ठ अभिनेते यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विक्रम गोखले यांनी भाजप- शिवसेना एकत्र यावे व त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. विक्रम गोखलेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यांवरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. तसंच, सूचक प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम गोखले यांनी केलेली वक्तव्यांची सध्या चर्चा आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या स्वातंत्र्यांविषयीच्या वक्तव्याला त्यांनी समर्थन दिलं होतं. तसंच, देश संकटाच्या कडेवर असताना भाजप आणि सेनेने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. विक्रम गोखलेंच्या या वक्तव्यांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. 'अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असं मला वाटत नाही. असे लोक समाजात असतात, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. वाचाः दरम्यान, महाविकास आघाडी सरकारबाबतही शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही जर ठरवून घेतलं आहे की जुळवून घ्यायचं त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल उद्या जाईल दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल. महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qD3w7n