मुंबईः कोर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी () अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan bail) याला अखेर जामीन मंजुर झाला आहे. आर्यन खानला गुरुवारी २६ दिवसांनंतर उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानच्या जामीनानंतर भाजपनं सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप करत आहेत. तर, वानखेडे यांच्याकडूनही मलिकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या वादात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एनसीबीच्या कारवाईवरुन निशाणा साधला होता. यावरुन भाजपचे प्रवक्ते यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. वाचाः 'राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळं त्यांचा जीव भांड्यात भडला. आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का?,' असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे. 'तसंच, वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी महिलांना असुरक्षित वाटते त्यांना दिलासा मिळणार का? नवाब मलिक व संजय राऊत यांवर जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का?,' असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 'अभ्यास करणे हे आमचे काम नाही,आम्ही फक्त मार्कस देतो, असे मुख्यमंत्री स्वत:च कबूल करत असताना नवाब मलिक मात्र जन्म-विवाह दाखल्याच्या अभ्यासासाठी मंत्रीपदपणाला लावतात. अभ्यास करायचा नाही हे मुख्यमंत्री सांगत असतानाही खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या 'महत्वपूर्ण' अभ्यासावर कारवाई होणार का?,' असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZIP6rf