Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे 'त्या' ज्योतिषाकडे का गेले?; माजी मंत्र्याने केला मोठा दावा

जळगाव: जळगाव जिल्ह्यातीलच काय, राज्यातील बहुतांश साखर कारखाने केवळ पवार कुटुंबियांकडेच आहेत, रोहित पवार यांचा जळगाव दौरा देखील याच कारणासाठी होता. चोपडा साखर कारखाना घेतल्यानंतर इतर कारखाने घेण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची योग्यता असताना निवडणुकीत पडले कसे?, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांच्यावरही महाजन यांनी निशाणा साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गुप्तता पाळत केलेल्या पाचोरा दौऱ्यावरही महाजन यांनी टोला हाणला. ( Latest News ) वाचा: जळगावातील जी. एम. फाऊंडेशन येथे आज गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा व जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसह खडसेंकडून होणाऱ्या आरोपांबाबत आपली भूमिका मांडली. जळगाव जिल्ह्यात नुकताच रोहित पवार यांचा दौरा झाला. याबाबत विचारले असता, राज्यातील सर्वच साखर कारखाने पवार कुटुंबियांकडे असून, आता जळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी देखील हाच प्रयत्न असल्याने त्यासाठीच त्यांचा दौरा असल्याचा आरोप महाजन यांनी केला. वाचा: यावेळी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. यांनी मला पाडले, त्यांनी मला पाडले असे आरोप करतात, तुमची योग्यता तर मुख्यमंत्रिपदाची होती ना, मग निवडणुकीत पडले कसे? साधी कोथळी ग्रामपंचायत तुम्हाला राखता आली नाही, अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंवर टीकेचे बाण सोडले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी पाचोरा येथे आले होते. या दौऱ्याबाबत महाजन यांना पत्रकारांनी विचारले असता, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि मुख्यमंत्री केव्हा होणार?, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी येथे येऊन ज्योतिषाकडे हात दाखविला असल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला. अशा प्रकारे आपण कधीही ज्योतिषाला हात दाखवत नसल्याचेही महाजन म्हणाले. सत्तेचा दुरपयोग करून जिल्हा बँक निवडणुकीत चीटिंग जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या नावाने भाजपला गाफिल ठेवून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने घात केल्याचा आरोप महाजन यांनी केला. तसेच निवडणूक लोकशाही मार्गाने न लढविता आपले उमेदवार बिनविरोध करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करीत भाजपच्या उमेदवारी अर्जांमधील कागदपत्रे गहाळ करून चीटिंग केली जात असल्याचा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. जिल्हा बँकेतील मलिदा खाण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jFJrcl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.