Type Here to Get Search Results !

करोना निर्बंध शिथील होताच भाजपनं केली 'ही' मागणी

मुंबई: करोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. त्यानुसार, दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या असून कार्यालयं देखील पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा एकदा मंदिरं सुरू करण्याची मागणी केली आहे. (After BJP Demands to ) निर्बंध शिथील करताना राज्य सरकारनं लोकल बंदी कायम ठेवली आहे. तसंच, धार्मिक स्थळं पूर्वीप्रमाणेच बंद राहतील, असं जाहीर केलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष संतापला आहे. भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 'राज्यात सगळे व्यवहार सुरू करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो. जेव्हा जेव्हा नवी नियमावली तयार होते, तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरांवर बंदी कायम केली जाते,' असं भोसले यांनी म्हटलं आहे. वाचा: 'येणाऱ्या पाच दिवसांत आमचा पवित्र असा श्रावण महिना सुरू होतोय. त्यामुळं किमान लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा आणि मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांना जगू द्या,' अशी मागणी भोसले यांनी केली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारनं अनलॉकची घोषणा केल्यानंतर भाजपनं मंदिरं उघडण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील निवेदन देण्यात आलं होतं. पंढरपूरची वारी पायी करू देण्याचाही आग्रह भाजपनं धरला होता. मात्र, सरकारनं प्रत्येक वेळी भाजपच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं होतं. आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकार व विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lrwxjJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.