Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवून आहेत; पटोलेंचा खळबळजनक आरोप

पुणेः उपमुख्यमंत्री () यांच्यावर थेट टीका करणारे काँग्रेसचे नेते () आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री (Cm ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याची सध्या चर्चा आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पटोलेंना फटकारले होते. त्यानंतर पटोलेंनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केल्यानं आघाडीतील कुरबुरी समोर येत असल्याचं बोललं जात आहे. वाचाः 'महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे, असं आश्वासन मी त्यांना देऊन आलोय. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत भूमिका मांडली होती. मला काही ते सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,' असं विधान नाना पटोले यांनी यावेळी केलं. वाचाः 'आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता द्यावा लागतो. बैठका, आंदोलन कुठे सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचासुद्धा रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,' असंही पटोले यांनी म्हटलं आहे. 'मी स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकायला लागली, कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार,' असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ALyUDk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.