मुंबई: वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणी पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा कर्मचाऱ्यांना दिली गेली होती. मात्र, आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय या कर्मचाऱ्यांना वा रेल्वेचा पास मिळणार नाही. ( ) वाचा: राज्य शासनातर्फे यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता परंतु, आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच काळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. वाचा: राज्य शासनाने याच महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या निश्चित केली होती. त्यामध्ये ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. लोकल, पॅसेंजर ट्रेन तसेच इतर रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी घालण्यात आली होती. याचा विस्तार करून आता यात अत्यावश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही सामील करण्यात आले आहे. इतर प्रवाशांना लागू असलेली अट या सर्वांनाही आता लागू असणार आहे. वाचा: आवश्यक सेवेतील कर्मचारी असोत अथवा अन्य सेवेतील कर्मचारी असोत यापुढे संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीलाच प्रवासासाठीचा दिला जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मासिक, त्रैमासिक, सहा मासिक पाससाठी हीच अट राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झाले आहे त्यांनाच लोकल रेल्वेने प्रवास करता येईल हे आता अधोरेखित झाले आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ntFLM4