म.टा.वृत्तसेवा, धुळे मध्यप्रदेशातील सेंधवाकडून शिरपूरकडे येणाऱ्या मालट्रकचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून ओव्हरटेक करून आलेली मारुती बलेनो कार ट्रकवर धडकली. त्यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर पाठीमागून येणारी इतर सात ते आठ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात कारमधील तिघे जागीच ठार झाले. तर इतर वाहनांतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेर जवळील बिजासन घाटात भिलटबाबा मंदिराजवळ उतारावर झाला. ( of 8 vehicles in bijasan ghat in wich three lost lives on the spot) दरम्यान, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर शिरपूर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ शिरपुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही ठप्प झाल्याने महामार्गावर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. क्लिक करा आणि वाचा- याबाबत असे की, मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पलासनेरजवळील बिजासन घाटात उतारावर बुधवार (दि.२७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सेंधवाकडून शिरपूरकडे येणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि उतार असल्याने ही ट्रक भरधाव वेगाने खाली येऊ लागली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी मारुती बलेनो कार करत पुढे येताच ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. तर कार पाठोपाठ मागून सात ते आठ वाहने वेगाने येत एकमेकांवर आदळली. बलेनो कारमधील अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. आणि इतर आठ जण गंभीर झाले आहेत. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये मालवाहू ट्रक क्रमांक (एमपी-०९/ एच एच-२०७१) बलेनो कार क्रमांक (एमएच-१२एसक्स-५००२)यासह अन्य सात ते आठ वाहनांचा या समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्यास सुरुवात करून पळासनेर गावातील ही ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. यावेळी रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने शिरपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस सुरक्षा पथक शिरपूरचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आली. तसेच या घटनेची नोंद शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CroQzN